Adivasi Vichar Manch

आदिवासी विचार (मंच) प्रतिष्ठान

महाराष्ट्र राज्य

आदिवासी अस्मिता , अस्तित्व आणि संस्कृती संवर्धनासाठी …….

आमच्याबद्दल...

संस्था नोंदणी अधिनियम १८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत आहे. त्याचबरोबर आदिवासी विचार प्रतिष्ठान संस्था दर्पण (भारत सरकार) अंतर्गत युनिक आयडी नोंदणी प्राप्त संस्था आहे. संस्थेला देणगी दिल्यास आपल्याला आयकरात ८० जी नुसार सवलत मिळते.

संस्थेची ध्येय व उद्देश

आदिवासी समाजासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ-क्रीडा, युवा युवती - महिला सबलीकरण, जेष्ठ नागरिक यांच्या विकासाकरिता धर्मादाय स्वरूपाचे असून आदिवासी विचार प्रतिष्ठान ही संस्था २७/०७/२०१६ पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे.

आपत्कालीन सहाय्य सेवा
नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकार, स्थानिक शासकीय संस्थाना तसेच स्थानिक लोकाना मदत / सहकार्य करणे.

रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम
संस्थेमार्फत महाराष्ट्रभर बेरोजगार तरुणांना विविध योजना, व्यवसायाबद्दल माहिती देऊन त्यांना रोजगार मिळविण्याचे प्रशिक्षण देणे.

पर्यावरण संवर्धन कार्यक्रम
वनीकरणाचे कार्यक्रम करणे, प्रदूषण मुक्त वातावरण निर्मितीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करणे, पर्यावरण समतोल राखण्यासाठी सामाजिक जनजागृती करणे व वृक्ष लागवड करणे असे जनहिताचे उपक्रम राबवणे.